Monday, January 17, 2011

महाराष्ट्रात स्वर्ग ?

महाराष्ट्रात स्वर्ग ? 
होय महाराजा. कोंकण हा महाराष्ट्रातील स्वर्गच नव्हे का? 
महाराष्ट्रात सर्वात जास्त वनस्पतींची विपुल उपलब्धी कोंकणात आहे. सर्वात जास्त बायो डायव्हर्सिटी, जैव विविधता कोंकणात आहे. विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. कोंकण निसर्गसमृद्धतेने नटलेला आहे.
कोकणाने महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला नररत्ने दिली आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. 
आता तर कोकणात जमिनीत सोने सापडले आहे. समुद्रात तर मोती आहेतच. 
आहे की नाही कोकण हा महाराष्ट्रातील स्वर्ग ?

Wednesday, January 5, 2011

हंगामी भक्ती

        आपले देव जसे हंगामी, उत्सव हंगामी, तशी आपली भक्तीही हंगामी असते. गणपतीचे दिवस आले की आपण गणरायाच्या भक्तीत बुडून जातो. नवरात्र आले की देवीपुढे रांगा लागतात. चंपाषष्ठीला आपल्याला खंडोबाची आठवण येते. रामनवमीला रामाची तर जन्माष्टमीला कृष्णाची आरती करण्यात मग्न असतो. अशी हंगामी भक्ती केल्याने ते ते देव प्रसन्न होतील अशी आपली समजूत (गैर) असते. त्या त्या देवांच्या उत्सवात त्या मंदीरांमध्ये एवढी गर्दी लोटलेली असते की ढकला-ढकलीत देवांचे दर्शनही होणे मुश्कील.
       ज्यांना खरोखरीच देवाचे मनापासून दर्शन घ्यावयाचे आहे, त्याचे रूप भक्तीने न्याहाळायचे आहे त्यांनी शांततेत, गर्दी नसताना दर्शन घ्यावे. रामनवमीला कृष्णाचे अगदी शांततेत दर्शन होते. जन्माष्टमीला गणरायाच्या मंदीरात कितीही वेळ बसले तरी कोणी हटकणार नाही. गणेशोत्सवात देवीच्या मंदीरात भरपूर आराधना करता येईल.
      शांत, निवांतपणे आणि आनंदाने अशी ही ऑफ सिझन दर्शनाची सूट मिळते. आपल्याला अशी सूट पाहिजे का ?