पाकिस्तानी संघाला धूळ चारीत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !
धोनीमहाशयांचे नशीब जोरावर आहे यात शंकाच नाही. हिम्मत है मर्दा, तो मदद दे खुदा ! अत्यंत दबावाखाली भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. सेहवागने मारलेले चौकार प्रेक्षणीय. सचिन आणि रैनाच्या फलंदाजीमुळे २६० चा स्कोर उभारता आला. रैना चिवट आहे. आस्ट्रेलिया विरुद्ध आणि आता पाकविरुद्ध शेवटपर्यंत तो टिकला. युवराज आणि हरभजन यांनी वेळेवर विकेट घेतल्या. नेहराने चांगली बोलिंग केली. आपली बोलिंग अचूक होती. पाकच्या मानाने आपण वाईड, नोबॉल कमी दिले. इथेच फरक स्पष्ट झाला.
आपले क्षेत्ररक्षण उत्तम झाले. आपला अंतिम सामना श्रीलंकेशी आहे. दिलशान, संगक्कारा यांना लवकर आउट केले, मलिंगा, मुरली यांना शरण गेलो नाही तर विश्वचषक आपलाच.
पुन्हा भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा !
धोनीमहाशयांचे नशीब जोरावर आहे यात शंकाच नाही. हिम्मत है मर्दा, तो मदद दे खुदा ! अत्यंत दबावाखाली भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. सेहवागने मारलेले चौकार प्रेक्षणीय. सचिन आणि रैनाच्या फलंदाजीमुळे २६० चा स्कोर उभारता आला. रैना चिवट आहे. आस्ट्रेलिया विरुद्ध आणि आता पाकविरुद्ध शेवटपर्यंत तो टिकला. युवराज आणि हरभजन यांनी वेळेवर विकेट घेतल्या. नेहराने चांगली बोलिंग केली. आपली बोलिंग अचूक होती. पाकच्या मानाने आपण वाईड, नोबॉल कमी दिले. इथेच फरक स्पष्ट झाला.
आपले क्षेत्ररक्षण उत्तम झाले. आपला अंतिम सामना श्रीलंकेशी आहे. दिलशान, संगक्कारा यांना लवकर आउट केले, मलिंगा, मुरली यांना शरण गेलो नाही तर विश्वचषक आपलाच.
पुन्हा भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा !
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete